पर्यावरणवादी : पृथ्वीवर फक्त मनुष्य प्राण्याचा अधिकार नाही. मनुष्य सोडून इतर जीवांच्या सुरक्षिततेच काय ?? त्यांच्या असुरक्षिततेबरोबरच पृथ्वीची असुरक्षितता देखील वाढतेय. ध्यानात येत आहे का ?? [ मागून आवाज : असली माणसं काय कामाची? ही माणस मरतायत तर मरू द्या ] अर्थतज्ञ : आर्थिक विकासाशिवाय आयुष्य कसे जगणार ? गरीबीत व उपासमारीत लोक युध्द करतील व विनाश होईल. हे चालणार का ? पर्यावरणवादी : विकासालाच मर्यादा शोधा मग. काय ? वैज्ञानिक : तुम्ही काळजी नका करू आम्ही यावरती पर्यायी उत्तर शोधत आहोत. पर्यावरणवादी ः जागतिक संकटातुन वाचवायचे असेल तर नियम कडक केले पाहीजे. सामान्य माणूस : किती ते नियंमानी जगायच ? [ मागून आवाज : असली माणसं काय कामाची? ही माणस मरतायत तर मरू द्या ] पर्यावरणवादी ः आधीच केवढी ही लोकसंख्या. नैसर्गिक साधनांचा बेसुमार वापर यामुळे किती गहन प्रश्न निर्माण झाले याची कल्पना तरी करता येतेय का ? [ मागून आवाज : असली माणसं काय कामाची? ही माणस मरतायत तर मरू द्या ] ...